मुंबई : कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यात आणि पर्यायाने देशात वाढत चाललेला आहे. परंतु जमेची बाजू म्हणजे राज्यात बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १९.४९% इतके आहे. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद