नवी दिल्ली : सध्या देशभरात कोरोना रुंगांच्या संख्येत अतोनात वाढ होताना दिसत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवत कोरोनाच्या वाढत्या संकटावरून टीका केली आहे.
गुरुवारी कोरोनाच्या संख्येने २० लाखाचा आकडा पार केला आहे. त्याच संदर्भात ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत २० लाखांचा टप्पा ओलांडला गेला आहे, मोदी सरकार बेपत्ता झाले आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
20 लाख का आँकड़ा पार,
ग़ायब है मोदी सरकार। https://t.co/xR9blQledY— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2020
१७ जुलै रोजी जेव्हा देशात कोरोना रूग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी असेच ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. १७ ऑगस्टच्या आपल्या ट्विटमध्ये १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोना रूग्णांची संख्या २० लाखांवर पोहचेल असे राहुल गांधींनी म्हटले होते. सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.