नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. कोची येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी कोचीच्या जनतेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार्यांना वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मोदी म्हणाले, “विकास आणि तरुणांच्या आकांक्षांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे मी 15 ऑगस्टला म्हटले होते. परंतु भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होत असताना देशाच्या राजकारणातही नवे ध्रुवीकरण सुरू झाल्याचे आपण पाहत आहोत. भ्रष्ट आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही राजकीय पक्ष उघड्यावर आले आहेत. संघटित होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून देशातील आणि केरळच्या जनतेला सतत सावध राहावे लागेल.”
पुढे ते म्हणाले की, “आमचे सरकार देशातील प्रत्येक गरिबांना पक्की घरे देण्याची मोहीम राबवत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केरळमधील गरिबांसाठी सुमारे दोन लाख पक्की घरेही मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी एक लाख 30 हजारांहून अधिक घरे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे.
तसेच या मोहिमेचा केरळमधील तरुण आणि येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोठा फायदा होणार आहे. ते म्हणाले की, त्यांचे सरकार केरळच्या प्रत्येक गावात वेगवान इंटरनेटसाठी सतत काम करत आहे. ते म्हणाले, “केरळच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आले आहे. संपूर्ण देशात जिथे जिथे राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, तिथे वेगाने विकास होत आहे.