मुंबई : कथित टीआरपी घोटाळा तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे, यांच्यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे.रायगड पोलिसांनी ही कारवाई केली असून गोस्वामी यांना मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.
#BREAKING | Amidst mega witch-hunt against Republic Media Network, Mumbai Police reaches Arnab Goswami's residence; Tune in for #LIVE updates #ArnabGoswami #Republic https://t.co/RZHKU3wOei pic.twitter.com/Au2Po9jd16
— Republic (@republic) November 4, 2020
पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
#BREAKING | Mumbai Police fortifies Arnab Goswami's house without summons; Tune in for #LIVE updates #ArnabGoswami #Republic https://t.co/jghcajZuXf pic.twitter.com/Bn6zGY0w4t
— Republic (@republic) November 4, 2020
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार ठरवलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
१० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपल्बिकचा दावा आहे.