Latest Marathi News

BREAKING NEWS

आजपासून दहावीची परीक्षा, पहिला पेपर मराठीचा; विध्यार्थ्यांना या नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

0

आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत असून सकाळी ११ ते २ या दरम्यान पहिला मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे.दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार विद्यार्थी परीक्षा देणार असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माध्यमिक बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे. या परीक्षेलाएकूण विद्यार्थीसंख्येमध्ये ८,४४,१६ मुले असून ७,३०,६२ मुली या परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा ६१ हजार ७०८ इतके कमी विद्यार्थी बसले आहेत. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नसेल. बोर्ड परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. प्रत्येक तालुक्यात भरारी पथक ही परीक्षा केंद्रावर जाऊन वेळोवेळी तपासणी करेल.परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरवणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. परिणामी १४४ कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतं.

तसेच परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.