श्रद्धाने आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या विरोधात 2020 मध्ये महाराष्ट्र पोलिसात तक्रार दाखल केल्याचे नुकतेच समोर आले आहे.आता 2020 मध्ये तक्रार करूनही या प्रकरणाची चौकशी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र पोलिसांनी प्रतिक्रिया दिली असून त्यावेळी हे प्रकरण का बंद करण्यात आले हे सांगितले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले की, त्यांनी श्रद्धाच्या तक्रारीच्या आधारे 2020 मध्ये तपास सुरू केला होता, परंतु नंतर श्राद्धकडून पुन्हा लेखी निवेदन करून हे प्रकरण मागे घेतले. त्यामुळे हा खटला बंद करण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मीरा भाईंदर-वसई विरार (एमबीव्हीव्ही) चे डीसीपी सुहास बावचे म्हणाले की, श्रद्धाने तिच्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “तिचा आणि आफताब पूनावाला यांच्यातील वाद मिटला आहे. त्या प्रकरणी जी काही आवश्यक ती कारवाई करायची होती. ती पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार श्रद्धाने चौकशीअंती स्वत: लेखी निवेदन दिले की कोणताही वाद नाही.
डीसीपी सुहास बावचे पुढे म्हणाले, श्रद्धाचा मित्र आफताब अमीन पूनावाले याच्या पालकांनीही तिला वाद मिटवायला लावला होता. तिने लेखी निवेदन दिले आणि त्यानंतर केस बंद करण्यात आली. 2020 मध्ये श्रद्धाने तुलिंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, ज्यामध्ये तिने आफताब पूनावाला तिच्यावर कसा अत्याचार आणि छळ करत होता हे सांगितले.
श्रद्धाने तिच्या तक्रार पत्रात लिहिले होते की, ‘आफताब मला मारून तुकडे करेल अशी धमकी देतो आहे. दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये तिच्या तक्रार पत्रात श्रद्धाने पोलिसांना सांगितले की “आफताबने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझे तुकडे तुकडे करण्याची धमकीही दिली.