Latest Marathi News

BREAKING NEWS

“मानव जातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार करावा”- चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन गुजरातचे राज्यपाल मा. आचार्य देवव्रत जी यांनी केले. देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रासायनिक खतांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आहे. नैसर्गिक शेती शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीसोबतच माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार करावा लागेल. नैसर्गिक शेती परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याविषयीची दिशा मिळेल, असा विश्वास कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

या परिषदेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.