सोलापूर |
पोटनिवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराला सुरुवात अडीच वर्षे सत्तेत नसल्याने महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकत्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले. प्रशासकीय दिल्या, गुन्हे दाखल होत असल्याने कार्यकर्ते दबावात होते. कोरोना काळात कारणे सांगून घरात बसणारे अजित पवार, जयंत पाटील दररोज गावोगावी आक्रोश सभा, मेळावे घेत आहेत, अशी टीका उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगोल्यात केली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत सांगोल्यात आले त्यावेळी भाजपचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा रणजितसिंह निंबाळकर, जिल्ह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ सुभाष देशमुख, आमदार स आवताडे, संघटनमंत्री धैर्यशील मं पाटील, शशिकांत चव्हाण, भा तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, सभापती संभाजी आलदर, शिवा गायकवाड, डॉ. ग. भि. मिसाळ, अॅड. ग भाकरे, नवनाथ पवार, सीताराम र विलास व्हनमाने, जगदीश बाबर, एन भोसले, वसंत सुपेकर आदी उपस्थित होते.