“आम्ही बंड केलेलं नाही आम्ही उठाव केला आहे. आम्ही आजही शिवसैनिक आहोत. आजूबाजूच्या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. जे आमच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आमची लायकी काढली. चार मतं घ्यायची ज्यांची लायकी नाही ते आम्हाला डुक्कर म्हणून लागले”, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.
“मतदार संघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर द्याल असं आम्हाला म्हटलं जातंय. पण मी सांगू इच्छितो आम्ही ३०-३५ वर्ष शिवसेनेसाठी झटून आमदार झालेलो आहोत. इतकी वर्ष शिवसेनेत काम केलं. त्याची आम्हाला ही बक्षिसी मिळत आहे का? आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर पडलो हे आमचं आम्हाला माहित आहे. त्यामुळे आमच्या मतांवर निवडून येणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना लगावला.
“आदित्य ठाकरे महाराष्ट्रात किती फिरले ते पाहा. त्यांचे दौरे काढा. सर्व रेकॉर्डवर आहे. पण एकटे शिंदे साहेब फिरले. माझ्या मतदार संघात पाचवेळा आले. शरद पवारांसारखा ८० वर्षाचा माणूस जळगावात तीन वेळा आला. टोपे आले, मुंडे आले, अजितदादा आले. जयंत पाटीलही आहे. तुम्ही का नाही आले?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला.