मुंबई |
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केलेल्या दिपाली सय्यद ही अभिनेत्री शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. विधानसभेमध्ये शिवसेनेकडून तिकीट मिळवून देखील पराभव स्वीकारावा लागल्याने, दिपाली सय्यद पराभवानंतर प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दाखवत होती.
आता दिपाली सय्यद ने शिंदे गटात प्रवेश केल्याचे निश्चित केल्याने, राज्यात वातावरण कसे आहे याचा अंदाज हळूहळू येऊ लागला आहे. शिंदे गटात प्रवेश करण्याचे ठरवल्यानंतर लगेचच रश्मी ठाकरे सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. दिपाली सय्यद हिने “मुंबई महापालिकेकडून खोके वेळेवर मातोश्रीवर पोहोचत नसल्याने, रश्मी ताईंना खंत होती” असे बोलत, नवीन वादाला तोंड फोडले आहे.