Latest Marathi News

BREAKING NEWS

मराठा समाजाच्या आरक्षणाचेआजवर कोण ठरले मारेकरी?

0

नमस्कार,
स्वात़ंत्र्या नंतरच्या मराठ्यांच्या अनेक पिढ्यांना देशमुखी, पाटीलकी आणि ९२-९६ कुळीच्या मानसिक चक्रव्यूहातून बाहेर पडूच दिले नाही.. मराठा पुढाऱ्यांनी मराठा समाजाला गृहित धरुनच सोशल इंजिनिअरिंग आणि पुरोगामी विचारांच्या नावाखाली मराठा समाजावरच अन्याय केला… अनेक पिढ्या अव्यवहारी शेती करण्यात खपल्या! प्रत्येक पिढी बरोबर शेतीचे तुकडे पडले.. असंख्य कुटुंबं शेतीचा तुकडा विकून शेतमजूर कधी बनले कळलेच नाही.. शिवरायांचा लढवय्या कुणबी मावळा कंगाल झाला.. महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८६९ मध्ये समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार मांडला.१९०२ साली राजर्षी शाहू महाराज छत्रपतींनी मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटने द्वारे आरक्षणाचा हक्क दिला.मागासलेपणाच्या निकषांत बसूनही गोरगरीब मराठा आरक्षणापासून वंचित राहिला..आता मराठा समाजाचा तारणहार म्हणून मनोज जरांगे-पाटील यांच्या चळवळीचा उदय झाला.ही चळवळ निर्णायक वळणावर पोहोचली आहे म्हणूनच.. शाब्बास मनोज जरांगे-पाटील!
वाचा माझे दर शुक्रवारी प्रकाशित होणारे “राजपाट” हे सदर.सोबत उन्मेष शहाणे यांचे खास चित्र.
-राजा माने,
समूह राजकीय संपादक,
Free Press Journal व नवशक्ति, मुंबई.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
सदस्य, महाराष्ट्र शासन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी, समिती.

Leave A Reply

Your email address will not be published.