Latest Marathi News

BREAKING NEWS

विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा

0


१४ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. १४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीनंतर त्याने सोमवार, दि. १२ मे २०२५ रोजी निवृत्ती जाहीर केली. या घोषणेनंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या घोषणेने चाहते आणि क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Leave A Reply

Your email address will not be published.