Latest Marathi News

BREAKING NEWS

युवकांनी अशा स्वरूपाची ताकद आगामी काळात निर्माण करायला हवी, जिचा वापरच करावा लागणार नाही – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांच्यावतीने कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी बुधवारी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी अखिल भारतीय विध्यार्थी परिषद (ABVP)च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील संघर्षाचे अनुभवही सांगितले. तसंच कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेण्याचं चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना आवाहन केलं.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आठवणी सांगत असतानां म्हटले कि, तुमची जनरेशन आता अशी झालेली आहे कि ज्यांच्यासमोर प्रश्न कमी निर्माण झाले आहेत. काश्मीरचा प्रश्न मार्गी लागला. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु झाले. बेरोजगारी कमी झाली. अयोध्येचा राम मंदिराचा विषय मार्गी लागला. उत्तराखंड मध्ये शंकराचार्यांच्या समाधीचे काम झाले. असे अनेक विषय मार्गी लागत चालल्यामुळे आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला असेल कि मग आपण करायचं काय?

तरुणांसमोर निर्माण झालेल्या या प्रश्नावर चंद्रकांत पाटील उत्तर देताना म्हणाले कि, आगामी सगळा काळ हा अजूनही ज्या काही ताकदी देश तोडण्याचा प्रयन्त करत आहेत त्या ताकदींना भीती वाटेल अशा प्रकारची ताकद उभी करायची असे पाटील यांनी म्हटले. म्हणून मी असं म्हणत असतो ताकद वापरावी लागणार नाही. त्या ताकदीच्या भीतीमुळेच प्रश्न संपतील अशी ताकद आगामी काळात देशात निर्माण करावी असा सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.